कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी नवीन जलकुंभ साठी निधी मंजूर करण्यात आला आहे.त्या कामासाठी उमरोली ग्रामपंचायत कडून १५ वित्त आयोगातील दोन लाखाचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, जलकुंभ बांधण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उमरोली ग्रुप ग्रामपंचायत मधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे शांतीनगर भागातील रहिवाशी आणि रायगड भूषण किशोर गायकवाड आणि ग्रांमस्थ जीवक गायकवाड यांनी शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधून द्यावी अशी लेखी मागणी केली होती. त्यासाठी उमरोली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत देखील ठराव घेण्यात आल्यानंतर उमरोली ग्रामपंचायत कडून डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी ग्रामपंचायतने १५ वित्त आयोगातून दोन लाखाचा निधी मंजूर केला असून त्या कामाचे कार्यदेश देण्यात आल्यानंतर शांतीनगर भागात बांधण्यात येणारी पाणी साठवण टाकीच्या कामाचे भूमिपूजन आज ११ डिसेंबर रोजी करण्यात आले.
पाणी साठवण टाकीचे भूमिपूजन जेष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख समीर साळोखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. त्यावेळी ग्रामस्थ दिनेश भासे,पप्पू सावंत,राजेश जाधव,अनिल भासे,विनायक पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. शांतीनगर मधील ग्रामस्थ रायगड भूषण किशोर गायकवाड आणि रेखा किशोर गायकवाड यांचे हस्ते पूजा करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थ हिराताई हिरे,अशोक गायकवाड,हरिचंद्र वाघमारे,मधुकर गायकवाड,हरिचंद्र भोईर,गंगाबाई गायकवाड,यशवन्त चव्हाण,तसेच रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष रेखा साळवी,संगीता गायकवाड,शोभा चव्हाण,आरती भोईर,गीता चव्हाण,जयश्री चव्हाण,निखिल गायकवाड अध्यक्ष शांतीदूत मंडळ, प्रशिक गायकवाड युवा कार्यकर्ता आदी ग्रामस्थ उपस्थित होते.डिकसळ गावात शांतीनगर भागात आता नवीन साठवण टाकी बांधली जाणार असून त्यानंतर सर्व ग्रामस्थांना नवीन नळ जोडण्या करण्यात येणार आहेत अशी माहिती किशोर गायकवाड यांनी दिली.
कर्जत लाईव्हसाठी प्राशिक गकर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी नवीन जलकुंभ साठी निधी मंजूर करण्यात आला आहे.त्या कामासाठी उमरोली ग्रामपंचायत कडून १५ वित्त आयोगातील दोन लाखाचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, जलकुंभ बांधण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उमरोली ग्रुप ग्रामपंचायत मधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे शांतीनगर भागातील रहिवाशी आणि रायगड भूषण किशोर गायकवाड आणि ग्रांमस्थ जीवक गायकवाड यांनी शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधून द्यावी अशी लेखी मागणी केली होती. त्यासाठी उमरोली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत देखील ठराव घेण्यात आल्यानंतर उमरोली ग्रामपंचायत कडून डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी ग्रामपंचायतने १५ वित्त आयोगातून दोन लाखाचा निधी मंजूर केला असून त्या कामाचे कार्यदेश देण्यात आल्यानंतर शांतीनगर भागात बांधण्यात येणारी पाणी साठवण टाकीच्या कामाचे भूमिपूजन आज ११ डिसेंबर रोजी करण्यात आले.
पाणी साठवण टाकीचे भूमिपूजन जेष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख समीर साळोखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. त्यावेळी ग्रामस्थ विजय पाटील, दिनेश भासे,पप्पू सावंत,राजेश जाधव,अनिल भासे,विनायक पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. शांतीनगर मधील ग्रामस्थ रायगड भूषण किशोर गायकवाड आणि रेखा किशोर गायकवाड यांचे हस्ते पूजा करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थ हिराताई हिरे,अशोक गायकवाड,हरिचंद्र वाघमारे,मधुकर गायकवाड,हरिचंद्र भोईर,गंगाबाई गायकवाड,यशवन्त चव्हाण,तसेच रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष रेखा साळवी,संगीता गायकवाड,शोभा चव्हाण,आरती भोईर,गीता चव्हाण,जयश्री चव्हाण,निखिल गायकवाड अध्यक्ष शांतीदूत मंडळ, मदन हिरे आरपीआय शाखाध्यक्ष डिकसळ, प्रशिक गायकवाड युवा कार्यकर्ता आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
डिकसळ गावात शांतीनगर भागात आता नवीन साठवण टाकी बांधली जाणार असून त्यानंतर सर्व ग्रामस्थांना नवीन नळ जोडण्या करण्यात येणार आहेत अशी माहिती किशोर गायकवाड यांनी दिली.