ग्रामसेविका रेश्मा पाटील यांना तळवली तर्फे अष्टमी ग्रामस्थांनी दिला निरोप

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष ग्राम सेविका सौ रेश्मा पाटील यांची या ग्रामपंचायतमधून शासनाच्या अटी शर्ती व प्रशासकीय नियमानुसार बदली करण्यात आली त्यांनी गेली सहा वर्षे या ग्राम पंचायतीच्या कामांमध्ये दिलेले योगदान या भावनेतून येथील ग्राम पंचायत सरपंच व सर्व सदस्य आणि कर्मचारी यांच्या वतीने त्यांना मोठ्या उत्साह वातावरणात निरोप देण्यात आला.

यावेळी ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ रुपाली कोस्तेकर,उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ रिया लोखंडे,सौ मृणाली मरवडे,शांताराम महाडिक व कर्मचारी सुभाष बामणे आदींनी ग्राम सेविका सौ पाटील यांनी गेली सहा वर्षे या ग्राम पंचायतीचा कार्यभार अतिदक्षतेत व मोठ्या जबाबदारीने केल्याने यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना मोठा उत्साह वातावरणात यावेळी त्यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने निरोप संभारभ देण्यात आले.

तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीत सौ रेश्मा पाटील यांनी गेल्या सहा वर्षाच्या कालखंडात येथील ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती देत तसेच गावच्या सर्वांगिक विकासासाठी लावलेला हातभार तसेच विविध विकासाची कामे गावपतीळीवर शासकीय योजना राबवण्याचे काम त्याच बरोबर शासकीय योजनांचा पाठपुरावा करत येथील जेष्ठ नागरिकांना व विविध महिला बचत गटांना परिपूर्ण माहिती देत येथील महिला वर्गाला स्वयं सहाय्यता मार्दशन येथील महिला वर्गांना वेळोवेळी करत सौ पाटील यांनी चांगले काम केले गेली सहा वर्षे या ग्राम पंचायतीला दिलेले योगदामुळेच मोठ्या उत्साह वातावरणात त्या निरोप देऊन सत्कार करण्यात आले असून त्यांचे जागेवर या ग्राम पंचायत समितीचे काम काज करण्यासाठी नवे ग्रामसेवक म्हणून शिद भाऊसाहेब हजर झाले आहेत .