पित्तावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे आहेत १९ प्रकारचे घरगुती उपाय

आयुर्वेदात वात, पित्त, कफ असे त्रिदोष सांगितले आहेत. जे प्राकृत अवस्थेत उपयोगी व शरिराचे धारण करणारे आहेत. तर विकृत झाले कि, हेच शरिरातील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात. पैकी “पित्त” हे अन्नपचन प्रक्रियेतिल महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचे प्राकृत असणे गरजेचे आहे. हे ज्याप्रमाणे पित्ताशयात येते. तसेच आपण घेतलेल्या आहारातून ही  येतं. त्यामुळेच जरी पित्ताशय काढले तरी, त्याचे काम आमाशयांत चालूच राहते. आपल्या शरिरात घेतलेला आहार जळतो व त्यातूनच अग्नि तयार होतो म्हणजेच जठराग्नि. म्हणूनच जेवणात तिखट, तेलकट पदार्थ खाल्ले कि भूक वाढते. म्हणजेच पित्त वाढते. आणि गोड खाल्ले कि, भूक शमते व आपले पित्तही कमी होते. पण जास्त गोड खाल्ले कि भूक मंदावते व अग्निमांद्य होते. अर्थात तुम्ही जे खाता, आधी त्याचे पित्तात व पर्यायाने अग्नित रूपांतर होते. म्हणूनच पित्त वाढु द्यायचे नसेल तर, आहाराकडे लक्ष द्यावे. अँटासिड च्या गोळ्या जास्त खाउ नये. कारण तो तात्पुरता उपचार असतो. अश्यावेळी फक्त पित्त घट्ट होते आणि त्याचेच खडे तयार होतात.

लक्षणे :- 
छातित जळजळणे, मळमळ, उलटिची भावना होणे,  जेवणानंतर करपट ढेकर येणे, डोके दुखणे, त्वचा विकार होणे, सर्वांगाला खाज सुटणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, केस गळणे.

पित्त वाढणे यावर काहि घरगुति उपाय बघू :- 
१) गुलकंद खावा, मनुके, खडिसाखर, गाईचे तूप हे सर्व आहारात असावे.
२) १ चमचा धणे व १ चमचा जिरे कुटून एक ग्लास कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवुन, कुस्करून प्यावे.
३) १/४ चमचा ज्येष्ठमध पावडर दूधातून अथवा पाण्यातून तिन दिवस घेतल्याने पित्त कमी  होते.
४) आयुर्वेदिक दुकानात सूतशेखर मात्रा मिळते हि उगाळून दूधातून घ्यावी. घरातले फ्रिजचे थंड दूध घ्यावे.
५) आवळ्याचे चूर्ण मधातून घ्यावे.
६) पुदिना, काळि मिरी, मीठ, कोथिंबिर व भाजलेल्या जिऱ्याचे चूर्ण मिसळून हि चटणी कायम जेवणात ठेवा.
७) सहद, हिरडा मिसळून खावे.
८) सुंठ व धणे पावडर २५ ग्रॅम घेउन याच्या तीन खुराक करून काढा करून प्यावा. पित्त समूळ नष्ट होते.
९) गुळवेल सत्व,  नारळ पाणी, मुगाचे कढण, पडवळाची भाजी असा पथ्यकारक आहार घ्यावा.
१०) कोहळेपाक, एक चमचा रोज सकाळी खावा.
११) जेवल्यानंतर दोन चमचे दाडिमावलेह व कामदूधा वटि रोज एक घ्यावी.
१२) प्रवाळ पंचामृत व प्रवाळ पिष्टि रोज जेवल्यानंतर मधातून घ्या.
१३) रोज मोरावळा, गुलकंद खावे.
१४) आठ दिवस सलग गवार, शेंगांची भाजी खाल्यास पित्त पूर्ण बरे होते.
१५) जांभूळ झाडाचे साल गरम पाण्यात मिसळून, नरम करून त्याचा रस काढा. व नारळाच्या रसातून एक महिना घ्या. पित्त कायमचे बरे होईल.
१६) पित्तप्रकृतीच्या व्यक्तिने रोज. अश्वनिप्राश एक चमचा खावे.
१७) रोज सकाळी चहा न घेता कोकम सरबत घ्यावे.
१८) दुपारि सब्जा व मध एकत्र करून प्यावे. पित्त होत नाही.
१९) दिवसभरातून दोन चमचे नुसते मध खावे. याने अॅसिडची निर्मिति बंद होते.

हे कटाक्षाने टाळा :-
फूलकोबी मसालेदार, चमचमित, बाहेरचे हॉटेलचे जेवण, नाश्ता, मिठाया, बटाटा, वांगे, मिरची, आंबवलेले सर्व पदार्थ वर्ज करा.

आयुर्वेद उपचारात रोगी ७५% केवळ पथ्यानेच बरा होतो २५% औषधाने. हे मात्र महत्वाचे. वरील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग न झाल्यास डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

….. Dr. Sameer B Pandit
M.D. (A.M.)

(हे केवळ आपल्या माहिती साठी आहे, परंतु हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)