इ. स. पुर्व ६०० मध्ये चरक व इ. स. पुर्व ४०० मध्ये सुश्रुत या आयुर्वेद तज्ञांनी आयुर्वेदांच्या काही पुस्तकात याचे वर्णन केल्याचे आढळते. भारतामध्ये साधारण १९९० च्या वेळी १ लाख लोकांमध्ये १ मधुमेहाचा रुग्ण आढळत असे. या रुग्णांचे साधारण वय ५० च्या पुढे असे. १० वर्षानी म्हणजेच २००० ला हेच प्रमाण १ लाखात १० असे आले. २०१० ला ह्यात कमालीची वाढ होवुन १ लाखात १०००० किंवा त्यापेक्षा जास्त रूग्ण आढळुन आले. यात वयोमान घसरून ३० वर्षे पर्यंत आल्याचे दिसुन येते. वय वर्षे ३० झालेल्या रुग्णांची संख्या सध्या सगळ्यात जास्त आहे. याला मुख्य कारण म्हणजे आजचे धावपळीचे जीवन, मानसिक तणाव, बैठेकाम व सगळ्यात महत्वाचे म्हणजे “चुकिचा आहार”.
मधुमेहाला शास्त्रीय भाषेत “डायबेटिस मलायटास्” असे म्हणतात. हा फार जुना रोग असुन पुर्वी याला श्रीमंतांचा रोग असे म्हणत असत. पण आज हा रोग कोणालाही होवु शकतो. मधुमेह मुळापासुन बरा होईल असे औषध आज तरी जगात कुठेही उपलब्ध नाही. पण जर योग्या आहार व काही नियम पाळल्यास मधुमेह अटोक्यात राहु शकतो. “निसर्गोपचार” पद्धत ही मधुमेही लोकांसाठी सोपी व कोणत्याही प्रकारचे साईड ईफेक्ट नसणारी उपचार पद्धती आहे. यापद्धतीचा वापर केल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आराम मिळाल्याची खात्रीशीर उदाहरणे आपल्याला आढळतात.
मधुमेह झालेल्या व्यक्तिला हृदयाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे बायपास, अँजिओप्लास्टी यासारख्या उपचार पद्धती वा सामोरे जावे लागते. यापासुन सुटका होते पण ती फार खर्चिक आहे. सामान्य माणसाला ते परवडणारे नाही. गोड खाणे बंद करणे, औषधे खाणे, महिन्यातुन शुगर चेक करणे यासारखे उपाय करताना निसर्गोपचार, योग व आयुर्वेद यांची साथ घेतलीत तर मधुमेहाचा सामाना करणे कठीण जाणार नाही.
मधुमेहाची लक्षणे :-
१) वारंवार लघवी होणे, २) खुप प्रेशरने लघवी होणे, ३) खुप तहान लागणे, ४) खुप भुक लागणे, ५) वजन कमी होणे, ६) जखम चिरघळणे, ७) गुप्त भागास खाज येणे, ८) नजर कमजोर होणे, ९) थकवा जाणवणे, १०) लैगिंक दुर्बलता, ११) हात पायाला मुंग्या येणे किंवा दुखणे, १२) हातापायाची आग होणे, १३) उष्णतेचा त्रास होणे. यासारखी लक्षणे आढळुन आल्यास रक्त व लघवी तपासुन घ्यावी. रक्तातील साखर समजण्यासाठी उपाशीपोटी व जेवण झाल्यावर रक्त तपासुन घ्यावे. जर साखरेचे प्रमाण १२० मि. ग्रा. पेक्षा कमी असेल तर ठिक, त्यापेक्षा जास्त साखर असल्यास तुम्हाला इथुन पुढे नियमांचे बंधन लागु झाले असे समजावे.
मधुमेहावर निसर्गोपचार (Naturopathy) हा खात्रीचा पर्याय आहे. हे उपचार सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे देखिल आहेत.
मैद्याच्या पोळ्या ऐवजी कोंडायुक्त पिठाच्या पोळ्या खाव्यात, बाजारात मिळणाऱ्या रिफाईंड तेला ऐवजी घाण्यावर काढलेले तेलच जेवणासाठी वापरावे. बाजारात मिळणाऱ्या पॉलिश केलेल्या तांदळा ऐवजी हातसडीचा तांदुळ वापरावा. चिज व बटर ऐवजी लोणी वापरावे. कोल्ड ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस प्यावा. मधुमेही व्यक्तिनी जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक असते.अति जेवण, सुकामेवा, कुत्रिम थंड पेये, तुप, लोणी, साय, बासुंदी, बेदाणे, गोड बिस्किट, ग्लुकोज, जैम, मुरंबा, बीट, गाजर, लाल भोपळा, साखर, गुळ, मिठाई, भात, बटाटे, साबुदाणे, तळलेले पदार्थ, पिकलेली केळी, मटण, दारू, अंडी, केक, चॉकलेट, रताळे, घेवडा, फणस, चिकु, द्राक्षे, आंबे, टरबुज, पपई, अंजीर, ऊस यापासुन जमेल तेवढे स्वत:ला लांब ठेवावे.
ग्रीन सलड, हिरव्या भाज्या, कोशिंबीर, मारी बिस्किट, हळद, तिखट, साधे दुध, ताक, दही, सैकरीन, ज्वारी, बाजरी, राई, गहु, कोबी, दुधी, कांदा, वांगी, कारली, कंटोली, चवळी, फ्लॉवर, शेगटाच्या शेंगा, सफरचंद, पेरू, अननस, मोसंबी, पपनस, किवी फ्रुट व मासे यांचे रोजच्या सेवनात उपयोग करावे.
नियमीत व्यायाम करावा. व्यायामामुळे मधुमेहावर कंट्रोल ठेवणे सोपे जाते. व्यायामामुळे शरिरातुन घाम बाहेर येतो व घामावाटे शरिरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. कोणता ना कोणता तरी व्यायाम करणे आवश्यक आहे जसे, चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे यासारखे सहज जमतील असे व्यायाम नियमीत करावेत. ज्या स्त्रीयांना वरील व्यायाम करणे जमणार नाही त्यांनी किमान घरातील सर्व कामे व कपडे धुणे हे तरी नित्य करावे. व्यायामामुळे शरिरशुद्धी होते. वाढलेले वजन कमी होते जे अतिशय आवश्यक आहे. व्यायामा सोबत योग (योगा) देखिल करावा. त्रिकोणासन, योगमुद्रा, उड्डियानबंध, कोणासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्यासन, सर्वांगासन, शवासन ही आसने शिकुन त्याची नियमीत कसरत करत रहावी. व्यायामाप्रमाणे उपवास देखिल करावा. आठवड्यातुन १ दिवस तरी फक्त लिंबु पाण्यावर काढावा. सुरवातील हे जमत नसेल तर दिवसभर लिंबुपाण्यावर राहुन रात्री मोड आलेल्या मुगाचे सुप व ग्रीनसलड खाण्यास हरकत नाही. काही दिवसांनी मात्र फक्त लिंबुपाणी यावर दिवस काढण्याचा प्रयत्न करावा. असे आठवड्यातुन २ दिवस करावे. मधुमेही व्याक्तिंनी ऑक्युप्रेशर चिकीत्सेचा आधार घेतल्यास फार उत्तम. ऑक्युप्रेशरमुळे स्वादुपिंडाचे कार्य सुधारते व शरीरात इन्सुलीनची निर्मीती वाढुन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. अनवाणी चालल्याने पण बराच फायदा होतो.
रोज २ टोमॅटो चावुन खावे (सुरीने कापु नये. अख्खे चावुन खावे. शक्यतो बिया खाऊ नये त्या हाताने काढुन टाकाव्यात.) असे १५ दिवस केल्यास शुगर कंट्रोल मध्ये रहाते. तसे रोजच २ टोमॅटो खाणे सहज शक्य आहे.
Dr. Sameer B Pandit
M.D. (A.M.)
(हे केवळ आपल्या माहिती साठी आहे, परंतु हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)