मीठ एक अनावश्यक आहारघटक : ज्याप्रमाणे साखरेला विष समजण्यात येते. त्याप्रमाणे मिठालादेखील विष समजण्यात येते. आहाराबरोबर मिठाचे सेवन केल्याने शरीर निर्माण झालेली विकृती दूर करण्यास मूत्रपिंडास (किडनीस) खूप परिश्रम पडतात. त्यामुळे अनेक दिवसानंतर मूत्रपिंड दूषित बनते व ते अकार्यक्षमही होते.
खरे पाहता आहाराला रुचकर करण्यासाठी आणि विशिष्ट प्रमाणात शरीरावश्यक घटक म्हणून आहारशास्त्राने मिठाला मान्यता दिली आहे; परंतु दिवसेंदिवस मिठाचा अनिबंध वापर केला जात असून तो शरीरस्वास्थ्यास हानिकारक आहे असे सिद्ध झाले आहे. मिठाशिवाय स्वयंपाक होऊच शकणार नाही अशी आपली समजूत असल्याने आपल्या रोजच्या आहारात मिठाशिवायचा एकही पदार्थ असत नाही. तज्ज्ञांच्या मते शरीरस्वास्थ्यासाठी मिठाची काहीही आवश्यकता नाही.
मनुष्याला पछाडणाऱ्या अनेक रोगांचे मूळ कारण मीठ आहे, हे आता अधिकाधिक आहारशास्त्रज्ञांना व वैदयकीय चिकित्सकांना पटू लागले आहे. जरूरीपेक्षा अधिक झालेले मीठ शरीरात होणाऱ्या कॅल्शियमच्या शोषणाला प्रतिबंध करते. डॉ. जेम्स ब्रेथवेट तर असे म्हणतात की, शरीरातील पेशींच्या चयापचयास अयोग्य रीतीने उत्तेजित करणारे मीठ हे एक रसायन असल्याने शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. डोकेदुखी, निद्रानाश, अर्धशीशी, हृदयरोग, यकृताचे विकार, सायन्यूसायटीस, बहिरेपणा, उचकी लागणे, संधिवात, स्थूलपणा आणि मूत्राशयाचे रोग या सर्व रोगांच्या मूळाशी मीठ असू शकते. कॅन्सरसारखे प्राणघातक रोगदेखील मिठाच्या अनिर्बंध वापराने उद्भवतात असे तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. फेड्रीक मारवूड यांनी कॅन्सरच्या १०० रोग्यांच्या आहाराची तपासणी केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की, ९९ रोगी आपल्या आहारात मीठयुक्त खाद्यपदार्थांचा जास्त वापर करणारे होते.
स्तनाचा कॅन्सर झालेल्या एका ४६ वर्षांच्या महिलेला एका अमेरिकन डॉक्टरांनी आहारात मीठ व साखर संपूर्ण बंद करण्याचा सल्ला दिला. याशिवाय दुसरा कोणताही उपाय सुचवला नाही. आश्चर्याची गोष्ट ही की, काही दिवसांनंतर जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासले तेव्हा तिची कॅन्सरची गाठ पुष्कळ लहान झाली होती व ती मऊदेखील झाली होती.
मनुष्याला रोज फक्त दोन ग्रॅम मिठाची जरूर असते. बाकीचे ५० ग्रॅम मीठ त्याला भाज्यांच्या आहारातून मिळते. कारण आपण आहारात घेत असलेल्या पालेभाज्या व फळे यांपासून नैसर्गिक स्वरूपातच आपल्या शरीराला मीठ प्राप्त होत असते. याहून जास्त मिठाची शरीराला जरूर पडत नाही. मिठामध्ये गुणांपेक्षा अवगुणच जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ते शरीराला नुकसानकारक आहे. मात्र अंगमेहनतीचे खूप काम करणाऱ्या मनुष्याला मिठाची अधिक जरूर पडते. कारण त्यांच्या घामावाटे जितक्या प्रमाणात मीठ बाहेर टाकले जाते तितक्या प्रमाणात त्यांच्या शरीराला मिठाची आवश्यकता असते. जर त्याने पुरेशा प्रमाणात मीठ घेतले नाही तर क्षारांच्या अभावी त्याच्या शरीरातून कळा येतात, स्नायूंना तडे जातात, व पुष्कळ थकवा वाटतो. बाकी सर्वसामान्यांनी आहारात मीठ वर्ण्य केले तर फायदेच अधिक होतात. आहारात मिठाचे सेवन वर्ण्य केले तर निद्रानाश दूर होतो. झोप चांगली येते. ज्या लोकांचा रक्तदाब वाढलेला असतो त्यांना मीठ वर्ज्य केल्याने पुष्कळ फायदा होतो. अशाप्रकारे आपल्या रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर शरीरस्वास्थ्य सुधारते. उलट जर मिठाचे प्रमाण वाढवले तर शरीरात अनेक रोग मूळ धरू लागतात.
नेहमी वापरात येणारे मीठ वापरण्यापेक्षा सेंधव मीठ वापरलेले कधीही उत्तम. सेंधव मीठाची किंमत ५ पटिने जास्त आहे. असे असले तरी आरोग्याच्या दृष्टिने किंमतीकडे थोडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे.
….. Dr. Sameer B Pandit
M.D. (A.M.)
(हे केवळ आपल्या माहिती साठी आहे, परंतु हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)