राजनाला कालव्याला पाणी सोडल्याने नेरळ शहरात नळपाणी योजना अडचणीत

ulhas-nadi
कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील कर्जत लगत असलेल्या पूर्व भागातील 40 गावातील 2000हेक्टर जमीन राजनाला कालव्याच्या पाण्यावर ओलिताखाली येत असते. या कालव्यात 26 डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून त्याचा परिणाम पेज नदी आणि पुढे उल्हास नदी मधून वाहणाऱ्या पाण्याचा पातळी खाली गेली आहे. दरम्यान,नदीतील पाण्याची पातळी खालावली असल्याने उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या नळपाणी योजना या अडचणीत आल्या असून पुढील दोन दिवसात नदीमधील पाण्याची पातळी जैसे थे होईल असा विश्वास पाटबंधारे विभाग यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

२६ डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याला पाणी सोडण्यात आले आणि त्याचा परिणाम पेज नदी तसेच उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये त्याचा परिणाम झाला.त्यामुळे उल्हास नदीवरील तीरावर असलेल्या असनेक नळपाणी योजना यांची पाण्याची पातळी खाली आली आणि त्यामुळे नदीच्या तीरावर असलेल्या अनेक नळपाणी योजना या पाणी पुरवठा करण्यात कमी पडल्या. त्यात नेरळ आणि माथेरान सारख्या नळपाणी योजना तर अडचणीत आल्या असून नेरळ ग्रामपन्चायत ने या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपल्या सर्व कर्मचारी वर्गासह जाऊन २७ आणि २८ डिसेंबर नदीमध्ये बांधा घालून आजूबाजूने जाणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. नेरळ गावात दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून ग्रामस्थांनी ट्रँकर मागवून पाण्याची तहान भागवली आहे. तर राजनाला कालव्याच्या सर्व भागात पाणी पोहचण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर कालव्यातील पाणी शेतात पोहचल्यानंतर पुढे पेज नदी आणि उल्हास नदीची पाण्याची पातळी स्थिर होत असते.

नेरळ सरपंच उल्हास नदीवर…
नेरळ ग्रामपंचायत कडून उल्हास नदीवर वाकस पुलाच्या खाली बंधारा बांधला जात आहे.माती भरून पिशव्या टाकून बंधारा बांधून पाणी अडविण्याचा नेरळ ग्रामपंचायत कडून प्रयत्न सुरू आहे.ते काम वेळेवर चार यासाठी आज सकाळ पासून नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी आपल्या कामगार वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी नदीवर पोहचल्या होत्या.सरपंच यांच्यासोबत सदस्या शीवाली पोतदार, श्रद्धा कराळे,गीतांजली देशमुख,उमा खडे हे देखील दिवसभर थांबून होते.
———————————-
२६ डिसेंबर रोजी राजनाला कालव्याच्या मुख्य कालव्यात पाणी सोडले असून ते टेल एन्ड पर्यंत जाण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत दरवर्षी पेज नदी तसेच उल्हास नाडीची पाणी पातळी खालावते. मात्र आणखी दोन दिवसात कालव्याचे पाणी सर्व भागात पोहचेल आणि त्यावेळीं दोन्ही नद्यांची पाणी पातळी पूर्वी सारखी होईल.
—एस व्ही मेंगाळ, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग
———————————-
उल्हास नदीचे पाणी पातळी दररोज सोमवारी खाली गेलेली असते,त्यामुळे त्या दिवशी पाणी उचलण्यात अडचणी येत असतात.दुसरीकडे डिसेंबर महिन्यात आठवडाभर पाणी पातळीचा प्रश्न कायम निर्माण होतो.त्यामुळे आम्ही नेरळ नवीन पाणी योजनेत उल्हास नदीवर बंधारा घेण्याचे सूचना पाणी पुरवठा विभागाला केली आहे.नेरळ साठी नवीन नळपाणी योजना मंजूर असून तिचे काम नवीन वर्षात सुरू होणे अपेक्षित आहे.
—मंगेश म्हसकर, उपसरपंच नेरळ ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *