अलिबाग : रायगड मध्ये करोनामुळे दिवसभरात तब्बल २९ जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिवसभरात ४४० करोनाचे नवे रुग्ण आढळून आलेत. पण ५०० जण करोनातून पुर्णपणे बरे झालेत. चिंताची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली. यामधील ५७१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
नव्या ४४० करोनाबाधितांची भर रायगड जिल्ह्यात पडली आहे. यामध्ये पनवेल मनपा हद्दीतील १५७, पनवेल ग्रामिणमधील ५४, अलिबाग ३०, मरुड १०, रोहा २५, सुधागड ५, श्रीवर्धन ८, म्हसळा १, महाड ३३, पोलादपूर २,उरणमधील ३६, खालापूर १९, कर्जत १०, पेण ५०, रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पेण ३, अलिबाग २, मुरुड २, रोहा १, श्रीवर्धन १ महाड १, पनवेल मनपा हद्दीत १०, पनवेल ग्रामिण १, उरण ४, खालापूर ४, पोलादपूर येथे १ अशा एकूण ८ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हयात दिवसभरात ५०० जण करोनातून पूर्ण बरे झालेत.रायगडमधील ६७ हजार ४९४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. रायगड मध्ये सध्या ३ हजार ३९५ रुग्ण आहेत. यात पेण २३७, अलिबाग २३७, मुरुड ३७, माणगाव ७६, पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ५०७, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३६७, उरणमधील १६४, खालापूर २०५, कर्जत ७७, तळा येथील ९, रोहा २६७, सुधागड २८, श्रीवर्धन २२, म्हसळा १०, महाड १३९, पोलादपूरमधील १३ करोनाबाधितांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८० टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.