विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार; मंदिर समितीने घेतला निर्णय,

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी  केलेल्या राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे लवकरच उघडण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. पण दुसऱ्याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी या आंदोलनापुरते उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर 17/3/2020 ते 31/8/2020 पर्यंत बंदच ठेवण्यात आले होते. राज्य सरकारनेही जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे 31 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंदच राहणार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सणवार, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार असल्याचे म्हटले आहे.