मुंबई : राज्यात बुधवारी रुग्णांच्या संख्येत तब्बल 17 हजार 433 जणांची भर पडली. तर 13 हजार 959 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 493 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.48 टक्के आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 01 हजार 703 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. बुधवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत.
राज्यात सध्या कोरोनासंकट वाढत आहे अशा काळात खाजगी शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक आर्थिक ताकदीवर गरज नसताना आयसीयू बेड घेत असल्याचं धक्कादायक वास्तव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.