मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात कोरोना व्हायरस संसर्गाची 14,492 नवी प्रकरणे समोर आली. ही एका दिवसात समोर आलेली सर्वाधिक प्रकरणे आहेत. दोन दिवसांपूर्वी एवढीच नवी प्रकरणे समोर आली होती.
आरोग्य विभागाच्या अधिकार्याने सांगितले की, आज समोर आलेल्या नव्या प्रकरणानंतर राज्यात कोविड-19 च्या एकुण प्रकरणांची संख्या 6,71,942 झाली आहे. याशिवाय महामारीमुळे आणखी 297 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या वाढून 21,995 झाली आहे.
राज्यात 20 ऑगस्टला सुद्धा संसर्गाची 14,492 प्रकरणे समोर आली होती. ही एका दिवसात समोर आलेली सर्वाधिक प्रकरणे आहेत. राज्यात सध्या 1,69,516 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 4,80,114 लोक बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.